सोमवार, २७ एप्रिल, २०२०

*देश संकटात असताना, धार्मिक रंग देणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही* .

             
         सर्वप्रथम या लेखातून मी कोणालाही उद्देशून किंवा कोणाच्याही भावना दुखवायचा माझा हेतू नाही. मात्र खेद वाटतोय  सद्यस्थितीतीला  डोळसपणे पाहताना, "सर्व धर्म समभाव" या वाक्याचा अर्थ समजून घेत असताना मनात अनेक प्रश्नचा संचय होतो. देशात आलेल्या महामारीला एकजुटीने लढा देण्यापेक्षा धार्मिक रंग देणे? कितपत योग्य वाटतं या हारामखोरांना. आपण एकत्र लढलो तर जिंकू मग हे आपसातील वादाचे काय लोणचे करायचे का? इथे प्रश्न कोणत्याही एका घटकाचा नाही, कोणत्याही विशिष्ट धर्माचा नाही, संकट हे सकल मानव जातीवर आलेलं आहे. याचा विचार होणे काळाची गरज बनली आहे.
          देशात सध्या Covid - 19 या आजाराने थैमान घातले आहे. याचा सामना करताना सरकार , राजकीय नेते मंडळी, सेवाभावी संस्था मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करत आहे. अश्या परिस्थितीत जातीधर्माच्या नावावर वाद घालणे निर्थकच!
भारत देशामध्ये सर्व धर्मातील लोक राहतात. त्यामुळे छोटे-मोठे वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र अश्या परिस्थितीत एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना भडकवून आपण देशाला अधिक संकटात नेत आहोत. याला जबाबदार सर्व भारतीय नाहीत. काही विशिष्ट महाभागांना राजकीय स्वार्थपोटी असे कृत्य सुचतात. सर्व भारतीय गुण्या- गोविंदाने  नांदणाऱ्या या देशात धार्मिक भावना भडकावून तडा निर्माण होत आहे. मग ही पोकळी भरून काढायला बरेच दिवस लागतात. इंग्रज भारतावर राज्य करीत असताना सर्व आपण सर्व भारतीयांनी एकत्र लढून इंग्रजांपासून मुक्ती मिळवली. त्यावेळेस पुढे आले ते सर्व भारतीयच. याचेच अनुकरण करत याच परिस्थितीवर एकत्र मिळून मात केली तर विजय निश्चितच मिळेल.
                  जातीय अस्मितेच्या प्रश्नामुळे बनलेल्या परिस्थितीत हिंसक घटना वाढल्या आहेत. काही विशिष्ट समाजाविरुद्ध सोशल मीडियाच्या  माध्यमातून अफवा पसरवून वैर भावना भडकवल्या जात आहे. अश्या घटनांमध्ये गटातील गरीब, दुर्बल नागरिक बळी पडताना दिसतात. या दडपल्या जाणाऱ्या नागरिकांना मदत करणे आणि आधार देणे हे प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकांचे कर्तव्य आहे. जेणेकरून अत्याचारग्रस्त नागरिकांना सुरक्षित वाटेल आणि समाजातील सामंजस्य टिकेल.
                 आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर अश्या थोर महामानवांच्या कर्मभूमीत वावरत असताना कुठेतरी या महापुरुषांचे विचार बाजूला ठेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी देशाला धर्मा-धर्मातील वादामध्ये अडकवणाचा प्रयत्न सतत होत असतो. असे प्रश्न सद्यस्थितीत उभे राहिले आहेत असे नाही. देशामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटात असे प्रश्न नेहमी उभे असतात. राजकीय हस्तक्षेप होत जातात, धर्मा- धर्मातील वाद उसळत जातात, समाजामध्ये तेढ निर्माण होते. मग या कारणामुळे परिणामी विकृतीला सामोरे जावे लागते. जणू ते आपले कर्तव्य विसरलेच, आणि भरारी घेताय ते स्वतःचे हित जपण्यासाठी. पण अश्यामुळे साध्य तरी काय होत असेल आणि अस्थीत्व टिकणार तरी किती दिवस? मग अशी विकृती करण्याचा काय फायदा? अति तिथे माती होतेच आणि परिणामी त्या मातीलाही मोल राहत नाही.
                आपण भारतातील सुजाण नागरिक आहोत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून या परिस्थितीत एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तसेच सोशल मीडियावर व्यक्त होताना भावनिक तेढ निर्माण होणार नाही. याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. यामुळेच आपण सर्व भारतीय जगासमोर वेगळा दृष्टिकोन बदलेल.

              -- केतन कोलते
               मो. ७७६९८८२६१२
                 औरंगाबाद ..




सोमवार, २० एप्रिल, २०२०

कविता करता आली नाही म्हणून काय झालं ......

कविता करता आली नाही म्हणून काय झालं,
माणूस म्हणून जगता आलं इतकं का कमी झालं,

नाही सुचले शब्द म्हणून काय झालं,
समोरच्याला चांगलं बोलून आपलंसं करता आलं इतकं का कमी झालं,

नाही जुळल्या कवितेच्या चार ओळी म्हणून काय झालं,
आपली नाती - गोती  निभावता आलं इतकं का कमी झालं,

यमक जुळणाऱ्या ओली नाही लिहता आल्या म्हणून काय झालं, आयुष्याचे गणित जुळवता आलं ,इतकं का कमी झालं,

नाही मिरवता आले कवी म्हणून, तर काय झालं,
आपल्या कर्तृत्वातून ताट मानेने जगता आले, इतकं का कमी झाले.....
 
            --  केतन कोलते




मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 जयंती 


               महामानव यासाठीच आजही भारत  देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो. आज या बाबासाहेबांची जयंती, अर्थात समाजातील सर्वच घटकासाठी आनंदाचा आणि त्याच्या प्रति कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस.
                   प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात आपण जयंती साजरी करतो. यावर्षी कोरोना सारख्या महामारीला देश सामोरे जात आहे, त्यामुळे ही जयंती घरीच साजरी करावी लागणार आहे.
           सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केला ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकजण कोणत्या कोणत्या मार्गाने आपली कृतन्यता  व्यक्त करताना दिसतोय. सांगायचे हेच की घरी राहून सुद्धा आपण चागल्या प्रकारे बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना उजाळा घालतोय. प्रशासन आणि सरकारी सूचनांचे पालन करत आपण सर्वजण अद्भूतपूर्ण जयंती साजरी करतोय याचा आनंद आहे.
                    वर्षभरातील 365 दिवसामध्ये आपण संविधानाला धरून चालतो. त्याचप्रमाणे समता,न्याय,बंधुता, एकता, स्वातंत्र्य असा अनमोल ठेवा बाबासाहेबानी दिला. कदाचित याच विचार तुम्हा- आम्हाला जवळ करण्यासारखा आहे.

       अश्या या महामानवाला विनम्र अभिवादन 💐💐
                                 - केतन कोलते

                     

बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय

  बळीराज्याचं जगणं कठीण होत चाललंय               कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि संपूर्ण देश थांबला. काही अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व था...